Ad will apear here
Next
शककर्ते शिवराय
स्वराज्याची स्थापना करीत शिवराय ‘रयतेचा राजा’ बनले. त्यांचा पराक्रम, धाडस, शूरता अशा अनेक गुणांचा मागोवा घेत विजय देशमुख यांनी ‘शककर्ते शिवराय’च्या दोन खंडातून समग्र शिवचरित्र वाचकांपुढे ठेवले आहे. 

पहिल्या खंडात सुरुवातीला शिवपूर्वकालीन उत्तर भारतातील व महाराष्ट्रातील स्थिती, त्या काळातील संत परंपरा विशद केली आहे. यानंतर निजामशाही व आदिलशाहीत जी मराठी कुळे उदयास आली, त्यातील सिंदखेडकर जाधवराव या महाराजांच्या मातृकुळाची व वेरूळच्या भोसले या पितृकुळाची माहिती आली आहे. पुढे शिवजन्म, शहाजीराजांचे स्वराज्य स्वप्न, यासाठी शिवरायांनी सुरू केलेला लढा व त्या अनुषंगाने अनेक प्रसंग येतात.

दुसऱ्या खंडात मिर्झाराजे जयसिंह, किल्ले पुरंदरचा तह, महाराजांची विजापूर मोहीम, सरनोबत नेताजी पालकर, आग्र्याची कैद व सुटका, आदिलशाह व पोर्तुगीज, सागरी शत्रू, महाराजांचे विजय पर्व व राज्याभिषेकाचे वर्णन आहे. राजधानी रायगड, जिजाऊंचे निधन, त्यानंतरच्या मोहिमा, संभाजी महाराजांचा रुसवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण, असे प्रसंग व त्याचे सुसंगत विवेचन यात केले आहे.

पुस्तक : शककर्ते शिवराय 
लेखक : विजय देशमुख
प्रकाशक : छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर
पाने : ११४४ 
किंमत : १८०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRYCB
Similar Posts
‘शककर्ते शिवराय’ची चौथी आवृत्ती सादर पुणे : सुप्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख (सद्गुरूदास महाराज) लिखित ‘शककर्ते शिवराय’ या द्विखंडात्मक दुर्मिळ व प्रासादिक शिवचरित्राची चौथी आवृत्ती नव्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.
बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोलापूर : ‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळेल,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी बार्शी येथे व्यक्त केला.
‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’ सोलापूर : ‘सोलापूर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक व्हावी, त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी पणन मंडळामार्फत सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे,’ अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
‘झाडांचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा’ सोलापूर : ‘प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्या रोपट्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा’, असे आवाहन पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language